Followers

Sunday, October 20, 2019

आसवांचे समीक्षण

महत्वपूर्ण असतात ही आसवे.
कारणांच्या श्रृंखलेसह गळणारे.
त्यामागे असते एखाद्याच्या भूकेची तळमळ.
त्याच आसवांनी शमवलेली तहान.
शरीरावरील जखमांची वेदना आणि अंत:करणाच्या
घावातुन उत्पन्न होणारी ज्वाळा.
भविष्याकडे डोळे वटारून पाहणारी चिंता,
अस्तित्वावर हसणारे प्रश्न आणि मनाला लागलेले न्यूनगंडाचे ग्रहण.
या नकारात्मक कारणांच्या श्रृंखला तुटल्यावर सुद्धा,
सावली प्रमाणे मानवा सोबत असतात ही आसवे.

© गंधार कुळकर्णी