२ मे २०१२ ला आपल्या स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालयात डॉ. अजय प्रभाकरराव देशमुख हे प्राचार्यपदी रुजू झाले होते. तेव्हा आम्हा सर्व परिवाराची माझे दादा यांचा ८१ वा वाढदिवस व सौ. आईचा ७५ वा वाढदिवस यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी चाललेली होती. सर्वच कार्यक्रमांमध्ये देशमुख सरांचा सक्रिय सहभाग होता. ७ मे ते १३ मे २०१२ व्याख्यान, गाण्याचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम व वाढदिवसानिमित्त सर्वांना एक दिवस स्नेहभोजन देण्यात आले होते. १३ मे ला दादांच्या वाढदिवशी अंजनगाव-सुर्जी येथील प.पू. श्री. जितेंद्रनाथ महाराजांचे आशीर्वादपर प्रवचन होते. त्यादिवशी देशमुख सरांसोबत अनिहा वहिनी सुद्धा कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा सरांनी माझी वहिनींशी ओळख करून दिली आणि त्यांना सांगितले की जयश्री माझ्या लहान बहिणीसमान आहे. मला कोण आनंद झाला म्हणून सांगते, आणि तेव्हा पासून न चुकता अगदी आमची रक्षाबंधन व भाऊबीज माझ्या घरी साजरी होवू लागली. तेव्हा पासून "अहो सर" या शब्दांची जागा "अरे दादा" या शब्दांनी घेतली.
त्यानंतर अजयदादा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.सी.यू.डी. डायरेक्टर म्हणून रुजू झालेत. काही काळानंतर विद्यापीठाचे कुलसचिव झालेत. विद्यापीठात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होती. तेव्हा मी आणि गंधार कार्यशाळेसाठी गेलो होतो. समारोपीय कार्यक्रमाला अजयदादा आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर दादा मला व गंधारला चहा घेण्यासाठी गेस्ट हाऊसला घेऊन गेलेत. घरी जाण्यास निघालो तेव्हा आम्ही नेलेली माझ्या भावाची गाडी पाहून अजयदादाला फार आश्चर्य वाटले. मग त्याने मला एका मागून एक चार प्रश्न विचारले.
१. जयूताई तुझी कार कुठे आहे ?
२. काय झाले ? विश्राम कुठे आहेत ?
३. घरी सर्व ठीक आहे नं ?
४. तुला काही आर्थिक अडचण आहे का ?
त्यावर मी शांतपणे त्याला सांगितले, "मी माझ्याच कारमध्ये येणार होते, पण वेळेवर चाक पंक्चर झाले. कार्यशाळेला उशीर झाला असता म्हणून मी निलेशची कार घेऊन आले. विश्राम घरीच आहेत. सर्व चांगले आहे. मला अजिबातच आर्थिक अडचण नाही." त्यानंतर दादाला थोडे रिलॅक्स वाटले. केवढी ही आपुलकी ! बापरे, मी किती सुखावले ! आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर त्याच्या संपर्कात जो कोणी येईल, त्याला एकदा आपले मानले की मग त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायचा.
कधी मी त्याला "अजयदादा" म्हणायची तर कधी "अजूदादा", कधी "बडेभैया" तर कधी फक्त "दादू". कधी विद्यापीठातील मीटिंग, कार्यशाळा, परिषद तर कधी परिवारातील कार्यप्रसंग अजूदादाची भेट व्हायचीच. २४ जानेवारी २०१९ ला अजय दादा मुंबई विद्यापीठात कुलसचिव या पदावर रुजू झाला. माझा आनंद गगनात मावेना. माझा भाऊ यशाची उच्च शिखरे चढत होता. अतिशय महत्वाकांक्षी, कुशल प्रशासक, धाडसी निर्णय क्षमता असणारा, बेधडक काम करणारा, मोठी स्वप्ने बघणारा, दुसऱ्यांना आधार देणारा. "काही चिंता करू नकोस, होऊन जाईल तुझे काम" असे सतत म्हणणारा. अशी किती विशेषणं लावावित त्याला ? मागच्या वर्षी मुंबईच्या परिषदेला त्याने मला बोलविले होते. पण माझे दादा(बाबा) अॅडमिट असल्यामुळे मी जावू शकले नाही. सतत दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माझा भाऊ स्वतःबद्दल कधीही काहीच सांगत नसे. दिसायचा पण सतत आनंदी, उत्साही, काम करण्यासाठी तत्पर. त्यामुळे कोणाला वाटणारही नाही की, याची प्रकृती ठीक नाही किंवा याला काही त्रास होतो आहे.
लॉकडाउनमध्ये माझे त्याच्याशी बरेचदा बोलणे झाले होते. आपण विचारले तरी नेहमी सांगायचा, "सगळं तर चांगलं आहे. तब्बेतीला काय झालं ? तब्बेत चांगलीच आहे." फार संघर्षमय जीवन होते त्याचे. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कामामध्ये नेहमी मग्न यामुळे कदाचित त्याचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असावे. एकाएकी त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ६ जून २०२० ला त्याने स्वतःचा पूर्ण चेकअप केला. ७ जूनला रिपोर्ट आलेत आणि तेही फारच धक्कादायक. त्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला व तो लास्ट स्टेजमध्ये होता. त्यात काविळ झाला. त्यामुळे कीमोथेरेपी करता आली नाही. हे सर्व मला २६ जूनच्या रात्री कळले. मला प्रचंड धक्का बसला. मी फारसे कोणाला न विचारता सरळ त्यालाच फोन केला. फोन उचलल्या गेला नाही. नंतर अजयदादाचाच फोन आला. पण त्यावर त्याचे भाऊ संजयदादा बोलले. अजयदादा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती होता. पण तो खूप हिमतीचा आहे. त्याची ईच्छाशक्ती दांडगी आहे. म्हणून तो या सर्वांतून बाहेर येईल. असे मला वाटत होते. इकडे माझी परमेश्वरालाही त्याच्या प्रकृती स्वास्थासाठी प्रार्थना सुरूच होती. पण २७ जूनला दुपारी १ वाजता मला फोनवरून कळले की डॉक्टरांनी त्याला घरी जाण्यास सांगितले आणि त्याची हिम्मत खचली. इकडे मी प्रचंड अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेत सर्व घरात फिरत राहिले. काही सुचत नव्हते. कोरोना, लॉकडाउनमुळे ईच्छा असूनही मी त्याच्या भेटीला जावू शकत नव्हते.
माझ्या मनावरचा ताण वाढला आणि मी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मी देवाला सतत माझ्या भावासाठी प्रार्थना करत होती. २ जुलैला दुपारी मी परत संजय दादांशी बोलले. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मन परत सुन्न झाले आणि रात्री ८:४० ला अजयदादाची प्राणज्योत मालवली असा संदेश आला. काय म्हणावे याला ? का रे बाबा असा सर्वांच्या नेत्रात अश्रू आणून निघून गेलास ? ७ जुलै हा अजयदादाचा जन्मदिवस. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी सर्वात आधी त्याला फोन करायची. पण या ७ जुलैला शुभेच्छांऐवजी अश्यापद्धतीचे लेखन अजयदादासाठी करावे लागेल. असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.
© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
दिनांक - ०६ जुलै २०२०
त्यानंतर अजयदादा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.सी.यू.डी. डायरेक्टर म्हणून रुजू झालेत. काही काळानंतर विद्यापीठाचे कुलसचिव झालेत. विद्यापीठात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होती. तेव्हा मी आणि गंधार कार्यशाळेसाठी गेलो होतो. समारोपीय कार्यक्रमाला अजयदादा आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर दादा मला व गंधारला चहा घेण्यासाठी गेस्ट हाऊसला घेऊन गेलेत. घरी जाण्यास निघालो तेव्हा आम्ही नेलेली माझ्या भावाची गाडी पाहून अजयदादाला फार आश्चर्य वाटले. मग त्याने मला एका मागून एक चार प्रश्न विचारले.
१. जयूताई तुझी कार कुठे आहे ?
२. काय झाले ? विश्राम कुठे आहेत ?
३. घरी सर्व ठीक आहे नं ?
४. तुला काही आर्थिक अडचण आहे का ?
त्यावर मी शांतपणे त्याला सांगितले, "मी माझ्याच कारमध्ये येणार होते, पण वेळेवर चाक पंक्चर झाले. कार्यशाळेला उशीर झाला असता म्हणून मी निलेशची कार घेऊन आले. विश्राम घरीच आहेत. सर्व चांगले आहे. मला अजिबातच आर्थिक अडचण नाही." त्यानंतर दादाला थोडे रिलॅक्स वाटले. केवढी ही आपुलकी ! बापरे, मी किती सुखावले ! आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर त्याच्या संपर्कात जो कोणी येईल, त्याला एकदा आपले मानले की मग त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायचा.
कधी मी त्याला "अजयदादा" म्हणायची तर कधी "अजूदादा", कधी "बडेभैया" तर कधी फक्त "दादू". कधी विद्यापीठातील मीटिंग, कार्यशाळा, परिषद तर कधी परिवारातील कार्यप्रसंग अजूदादाची भेट व्हायचीच. २४ जानेवारी २०१९ ला अजय दादा मुंबई विद्यापीठात कुलसचिव या पदावर रुजू झाला. माझा आनंद गगनात मावेना. माझा भाऊ यशाची उच्च शिखरे चढत होता. अतिशय महत्वाकांक्षी, कुशल प्रशासक, धाडसी निर्णय क्षमता असणारा, बेधडक काम करणारा, मोठी स्वप्ने बघणारा, दुसऱ्यांना आधार देणारा. "काही चिंता करू नकोस, होऊन जाईल तुझे काम" असे सतत म्हणणारा. अशी किती विशेषणं लावावित त्याला ? मागच्या वर्षी मुंबईच्या परिषदेला त्याने मला बोलविले होते. पण माझे दादा(बाबा) अॅडमिट असल्यामुळे मी जावू शकले नाही. सतत दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माझा भाऊ स्वतःबद्दल कधीही काहीच सांगत नसे. दिसायचा पण सतत आनंदी, उत्साही, काम करण्यासाठी तत्पर. त्यामुळे कोणाला वाटणारही नाही की, याची प्रकृती ठीक नाही किंवा याला काही त्रास होतो आहे.
लॉकडाउनमध्ये माझे त्याच्याशी बरेचदा बोलणे झाले होते. आपण विचारले तरी नेहमी सांगायचा, "सगळं तर चांगलं आहे. तब्बेतीला काय झालं ? तब्बेत चांगलीच आहे." फार संघर्षमय जीवन होते त्याचे. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कामामध्ये नेहमी मग्न यामुळे कदाचित त्याचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असावे. एकाएकी त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ६ जून २०२० ला त्याने स्वतःचा पूर्ण चेकअप केला. ७ जूनला रिपोर्ट आलेत आणि तेही फारच धक्कादायक. त्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला व तो लास्ट स्टेजमध्ये होता. त्यात काविळ झाला. त्यामुळे कीमोथेरेपी करता आली नाही. हे सर्व मला २६ जूनच्या रात्री कळले. मला प्रचंड धक्का बसला. मी फारसे कोणाला न विचारता सरळ त्यालाच फोन केला. फोन उचलल्या गेला नाही. नंतर अजयदादाचाच फोन आला. पण त्यावर त्याचे भाऊ संजयदादा बोलले. अजयदादा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती होता. पण तो खूप हिमतीचा आहे. त्याची ईच्छाशक्ती दांडगी आहे. म्हणून तो या सर्वांतून बाहेर येईल. असे मला वाटत होते. इकडे माझी परमेश्वरालाही त्याच्या प्रकृती स्वास्थासाठी प्रार्थना सुरूच होती. पण २७ जूनला दुपारी १ वाजता मला फोनवरून कळले की डॉक्टरांनी त्याला घरी जाण्यास सांगितले आणि त्याची हिम्मत खचली. इकडे मी प्रचंड अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेत सर्व घरात फिरत राहिले. काही सुचत नव्हते. कोरोना, लॉकडाउनमुळे ईच्छा असूनही मी त्याच्या भेटीला जावू शकत नव्हते.
माझ्या मनावरचा ताण वाढला आणि मी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मी देवाला सतत माझ्या भावासाठी प्रार्थना करत होती. २ जुलैला दुपारी मी परत संजय दादांशी बोलले. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मन परत सुन्न झाले आणि रात्री ८:४० ला अजयदादाची प्राणज्योत मालवली असा संदेश आला. काय म्हणावे याला ? का रे बाबा असा सर्वांच्या नेत्रात अश्रू आणून निघून गेलास ? ७ जुलै हा अजयदादाचा जन्मदिवस. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला मी सर्वात आधी त्याला फोन करायची. पण या ७ जुलैला शुभेच्छांऐवजी अश्यापद्धतीचे लेखन अजयदादासाठी करावे लागेल. असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता.
© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
दिनांक - ०६ जुलै २०२०
जयश्री Mam आपल्या दादांसोबतच्या अनुभवावरून हेच कळते कि ती व्यक्ती किती हृदयस्पर्शी होती.तुम्ही केलेल्या अनुभव कथनावरून तुमचे त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध अगदी घट्ट होते आणि ती व्यक्ती मोठ्या पदावर असूनही अगदी पाण्यासम नितळ होती असे जाणवते. देव त्यांच्या आत्म्याला परम शांती देवो हिच प्रार्थना. 🙏
ReplyDelete👏👍👍
ReplyDelete