निघाला होता एक प्रवासी
ध्येय त्याचे साहित्य नगरीपुस्तकांची शिदोरी सोबती
शंभर पानांची भूक जबरी
भाषेवर प्रभुत्व मिळवून
शब्दांनाही गुलाम केले
छंदाचीच सवय करून
दहा पानं रोज लिहिले
उत्स्फूर्तपणे जे-जे सुचले
तेच त्यांचे काव्य झाले
कवितेच्या संसारात त्यांच्या
असोशी,रेघा,अंगारा जन्मले
जरी यशाचे स्वामी झाले
सोडीले नाही जन्मक्षेत्र
श्रोत्यांनीच करून पारख
ठरवले त्यांना सरस्वतीपुत्र
जरी दुःखाची झळ लागली
तरी सदानंदी जीवन जगले
दुःखालाही विषय मानून
दुःखावरही व्याख्यान दिले
सहवास तुमचा आज नाही
ही एकच माझी खंत ठरली
वक्तादशसहस्त्रेषुस दिलेली
कविताच माझी श्रद्धांजली
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८
वा, छान कविता
ReplyDeleteवासमर्पक वर्णन
ReplyDeleteहृदयातील संवेदना काव्यातून अतिशय सुंदर रेखाटल्या.
ReplyDeleteसुंदर शब्द रचना
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete